रत्नागिरी:-शासकीय सेवेत असताना सोशल मीडियावर शासनाच्या विरोधात नागरिकांना भडकवणे तसेच शासनाची बदनामी करणे, निर्भय बनो या व्हॉटस्ऍप समूहावर शासनाच्या विरोधी पोष्ट ही स्वत:च्या मोबाईलवरून रत्नागिरी तालुक्यातील कशेळी शाळेवरील शिक्षकावर जि. प. प्रशासनाने निलंबनी कारवाई केली. जि. प. प्रशासन स्तरावरून या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीकडील अहवालावरून ही बाब सिद्ध झाल्याने ही कारवाई करण्यात आली असल्यो जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी सांगितले.
जिल्हा परिषद प्रशासनाने रत्नागिरी तालुक्यातील कशेळी प्राथमिक शाळेतील शिक्षक प्रवीण किणे यांना निलंबित करण्याची कारवाई केल्याची माहिती पूजार यांनी दिली. सोशल मीडियावर शासनाविरोधात नागरिकांना भडकवणे, प्रशासनी बदनामी करणे, शाळेत सहकारी तसेच व्यवस्थापन समितीमध्ये मतभेद करणे, शाळेचा संगणक घरी घेवून जाणे, तसेच शाळेतील शालेय पोषण आहारातील तांदूळ परस्पर घेवून जाणे, पावती पुस्तकावर मुख्याधिकाऱ्याची परवानगी न घेताच नाव छापणे आदी कारणांचा ठपका जि. प. प्रशासनाने ठेवला आहे.
कशेळी शाळेतील या पदवीधर शिक्षकाविरोधात जिल्हा परिषदेकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने चौकशी समिती नेमून या प्रकरणी चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये हा शिक्षक प्रथमदर्शनी दोषी आढळला आहे. यामुळे त्याच्यावर गुरूवारी जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबनाची कारवाई केल्यो मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी सांगितले. या शिक्षकाने कर्तव्यात गंभीर स्वरुपाची कसूर करून महाराष्ट्र जिल्हा परिषद जि.प. (वर्तणूक) नियम 1967 मधील तरतूदीचा भंग केलेला असल्या ठपका जि. प. प्रशासनाने ठेवला आहे. यापूर्वीही या शिक्षकाने अशाच प्रकारचे गैरवर्तन केले होते. तरीही त्याच्या वर्तनात कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली दिसत नाही. यामुळे जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 मधील भाग 2 नियम 3 (1) (अ) मधील तरतूदीनुसार प्रविण किणे याला जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या आदेशावर मुख्य कार्यकारी अधिकारी पूजार यांची स्वाक्षरी आहे.