रत्नागिरी : तालुक्यातील उक्षी – वांद्री पुलावर वाहन चालकांना भुताटकी दिसतेय अशा अफवा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केल्या जात आहेत. या पुलावर असा कोणताही प्रकार नाही आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे वारंवार आवाहन करण्यात आले आहे.
मात्र आता सोशल मीडियावर या कथित भुताटकीची प्रचंड चर्चा रंगू लागली आहे. काही वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणीही घाबरु नये आणि कोणतीही खातरजमा न करता केवळ सोशल मीडियावर आलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगून सुद्धा लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खरचं भूत आहे का? नेमकी भुताटकी कुठून येते? हे जाणून घेण्यासाठी आणि या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी आज रात्री काही युवक पुलावर आणि पुढील परिसरात पहारा देण्याच्या विचारात आहेत. पहारा दिल्यानंतरच पुढील सत्य सर्वांसमोर येणार आहे.
मात्र ग्रामीण वार्ता या प्रकरणाची पुष्टी करत नाही. आम्ही लोकांना जागरूक करण्याचे काम करत आहोत. लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असेही वारंवार सांगत आहोत.