चुलीवर जेवण बनवताना साडीला आग लागल्याने भाजली
गुहागर : तालुक्यातील एका महिलेचा मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता चुलीवर जेवण बनवत असताना त्यांच्या साडीच्या पदराला अचानक आग लागली होती. या दुर्घटनेत त्यांचे दोन्ही पाय, हात आणि कंबर भाजली होती.
उपचारासाठी त्यांना सुरुवातीला बोरीवली येथील भगवती रुग्णालय, त्यानंतर क्रिस्टल हॉस्पिटल दहिसर आणि नंतर नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु १९ एप्रिल रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेची गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करणेत आली आहे.
गुहागरमधील महिलेचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू
